Posts

Showing posts from May, 2018

जाऊ आनंदाच्या गावा - 9

Image
गावगाडा भारतात ग्रामीण संस्कृती जितकी समृद्ध होती तितकी कुठल्याच देशात बहुधा नसावी किंबहुना नव्हतीच इतरत्र. ज्यावेळी पाश्चिमात्य देशात रानटी संस्कृती जोर धरत होती त्यावेळी हिंदुस्थानातील गावे वेदघोषाने जागी व्हायची आणि कीर्तनाने आत्मतृप्त होऊन निद्राधीन व्हायची. स्वयंपूर्ण खेडी, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि बाराबलुते अठरापगडजातींनी भरलेले गाव, कित्येक चांगल्या वाईट परंपरा इथे जन्माला आल्या नंतर काही लुप्त झाल्या आणि काही टिकल्याही. त्यातल्या त्यात पूर्वीचे निबिड अभयारण्य आणि सध्याच्या मराठवाड्यात तर सतत आक्रमणं,लढाया अगदी कृष्ण देवरायापासून किंवा शालिवहनाच्या शासनकाळापासून ते अलीकडील मराठे, निजाम आणि नंतर स्वतंत्र भारत या सर्व संक्रमणाच्या काळात मराठवाड्याच्या ग्रामीण संस्कृतीवर मोठा परिणाम पाहायला मिळतो.  या सर्व कठीण, अतिकठीण किंवा सुकर काळात आमच्या गावानेही अनेक प्रसंग आपल्या पोटात सामावून घेतले पण आम्हाला मोजकेच माहित आहेत एवढंच. पूर्वीचे आनंदगाव म्हणजे बहुतेक २०० वर्षांपूर्वी नक्की काळ सांगता येणार नाही पण जुन्या जाणत्या माणसाकडून ऐकायला मिळाले त्...

जाऊ आनंदाच्या गावा - 8

Image
हरीमाय  आमचे दादा म्हणजे वडिलांचे वडील बन्सी रावजी विघ्ने. अतिशय बेरकी माणूस. अंगात प्रचंड ताकद, धिप्पाड शरीरयष्टी आणि अहोरात्र शिंदीवनात नशेत सुस्त मस्त जीवन जगणारी एक दिलदार आसामी!  पाटलाचे साहेबराव आणि आमचे दादा हे जिवलग मित्र शिंदीवनात यांची मैत्री सुरू झालेली ती शेवटपर्यंत टिकली. यांचे आहारशास्त्रही सर्वसमावेशक, अगदी बैलापासून ते मोरापर्यंत सर्वच प्राणीपक्षी यांच्या पोटाची आणि जिभेची हौस पूर्ण करणासाठी चालायचे.  एकदा भावकीच्या भांडणाचा राग मनात धरून यांनी एकजणांचा बैल कापून, शिजवून फस्त गेला असा किस्साही दादांनीच आम्हाला सांगितला होता. रावजीबुवांचा एकुलता एक वंशाचा दिवा असल्यामुळे जडणघडण तशी अतिशय बेफिकीरीत झालेली. आणि त्याचा परिणाम म्हणून बन्सीराव आणि वाद हे समीकरण गावाला मान्यच करून घ्यावे लागले. त्यावेळी गावाच्या पाटलाला सुद्धा यांनी कधी जुमानले नाही पाटलांसोबतसुद्धा मारामारी करून त्यांच्याही दहशतीला आव्हान देणारे हे गावातले पहिलेच गावकरी नंतर पाटलांच्याच नात्यातील मुलगी यांनी दुसरी धर्मपत्नी म्हणून घरात आणली ती म्हणजे आमची आजी ह...

जाऊ आनंदाच्या गावा - 7

Image
शाळेतला पहिला दिवस प्रत्येक गोष्टीच एक वय असतं आणि त्याचे अर्थही प्रसंगानुरूप लावले जातात. पोरगी वयात आली म्हणजे इथे वेगळाच शृंगारिक अर्थ वगैरे किंवा पोराचं वय निघून चाललंय इथंही भलताच काळजीचा अर्थ, आता वय झालं ! इथं निराशावाणा अर्थ, या वयात तुम्हाला हे शोभतं का?असा टोमानवजा अर्थही वयोमानावरून काढता येतो शेवटी काय तर मराठीचे बोल कौतुके।।आता आमचंही वय शाळेत घालण्याजोगं झालं होतं एवढ्यासाठीच वयाची इतकी ऐशीतैशी !! आणि मग याच वयाचा दाखला देऊन  एके दिवशी घरच्यांनी शाळेत नाव घालायचं असं ठरवलं. मग काय आनंदाचे डोही आनंद तरंग आपण शाळेत जाणार म्हणजे नवे कपडे, अनवाणी पायाला एक नवी कोरी पॅरागॉनची चप्पल आणि दप्तर, पाटी पेन्सिल असं सर्वच नवीन मिळणार. शिवाय रोज संध्याकाळी घरी जेवणानंतर कविता, बाराखडी म्हणून दाखवल्यावर सगळेच कौतुक करणार आणि आपण काहीतरी वेगळे आहोत याचा अनुभव अगदी बालवयातच, पुढे जाऊन  काही त्याला अहंकार म्हणून वाढवतात तर काहीजण आत्मविश्वास! पण व्यक्तिमत्वाची बीज अशाच छोट्या मोठ्या गोष्टीतून पेरली जातात बरं लहानपणात! आमच्या सवंग...